आज मुंबईत भाजपचा वर्धापन दिन मुंबईकरांना वाहतुकीचा ञास देत संपन्न झाला.माझ्या मते वर्धापनदिन म्हणण्यापेक्षा फेकाफेकीचा शो म्हटल तरी चुकीचे होणार नाही.भाजपाने वर्धापनदिनी फक्त राष्ट्रवादी व पवारांनाच टार्गेट केले गेले.का..? सध्या राष्ट्रवादीचा माजी उपमुख्यमंञी तसेच भावी मुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा चालू आहे.सध्या समाजातील प्रत्येक घटक नाराज आहे त्यामूळे या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून दादांना प्रचंड जनाधार लाभत आहे.यावरून 2019 चे महाराष्ट्रातील चिञ काय असेल हे सांगण्याची गरजच नाही. आज चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की छगन भूजबळांच्या बाजूला 2-3 कोठडी मोकळी आहे,असेलही मग त्यात विजय मल्ल्या,नीरव माेदींना टाका ना आणी राहीलेत अजितदादा,ज्यावेळी तुमचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस विधानसभेत दादांना क्लिनचिट देत होते त्यावेळी तुम्ही झोपले होते का.फडणविसांनीच कबूली दिली की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय फायद्यासाठी केले होते.तसा भ्रष्टाचारच झालेला नाही. आज एका गोष्टीच खूप हासू आल,देवेंद्र फडणविस म्हणाले ना की,पवार साहेब औषधालाही शिल्लक राहणार नाही